Marathi Suvichar/ मराठी सुविचार
Marathi suvichar |
Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी मराठी सुविचार घेऊन आलेली आहे.
मराठी सुविचार हे माणसाला प्रेरित करत असतात.माणसाच्या आयुष्याची निगडित असतात. ज्यांच्याकडे विचारशक्ती जास्त असते,तेच आपल्या जीवनात जास्त यशस्वी होतात.प्रत्येकाने सुविचारांच पालन आपल्या जीवनात केलच पाहिजे.
आजच्या आपल्या सुविचार पोस्टमधे मराठी सुविचार,Marathi Suvichar, Suvichar Status In Marathi, Suvichar Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला हे collection नक्की आवडेल.तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की Share करा.
🙏…धन्यवाद…🙏
Marathi Suvichar/ मराठी सुविचार
Marathi suvichar |
“सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत’’
हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला
कारणीभूत “राहतो.
“माणसांतील माणुसकी जागृत करणे’’ हाच आहे खरा धर्म, तेच आहे खरे शिक्षण व तोच आहे मानव जातीच्या सर्व समस्यांवरील खरा रामबाण उपाय.
“प्रारब्धवाद आणि पलायनवाद’’ या राहू‚केतूचे भारतीय समाजाला लागलेले ग्रहण सुटण्यासाठी प्रयत्नवाद व वास्तववाद यांची कास धरणे आवश्यक आहे.
“पैसा हाच देव व संपत्ती हीच लक्ष्मी’’, असे माणसाला जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत माणसातील माणुसकी निर्माण होणार नाही व मानवजातीला अपेक्षित असलेले सुख‚शांती‚समाधान कधीही प्राप्त होणार नाही.
“पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’’ हे खरे नाही. जीवनातील 90 टक्के घटना या स्वाधीन असून फक्त 10 टक्के घटना पराधीन असतात.
“परमेश्वर एक आहे, मानव जात एक आहे, मानवी मन एक आहे, मानवी संस्कृती एक आहे’’, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विश्वमानवाच्या विश्वशांतीचे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी प्रयत्न करण्यात मानवजातीचे कल्याण आहे.
“तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी’’ या संत उक्तीप्रमाणे श्री सद्गुरू साधकाला जागा करून त्याला त्याच्याचपाशी असलेल्या देवाची जागा दाखवितात.
“जग सुखी तर आपण सुखी व जग दुःखी तर आपण दुःखी’’, अशी जाणीव माणसांच्या बीत वैज्ञानिक दृष्टीकोनातून निर्माण केल्याशिवाय जगात खरी क्रांती होणार नाही.
“गृहलक्ष्मीकडे लक्ष्मी या भावनेने पहाणे’’,
हा ऐश्वर्य लक्ष्मीला घरात स्थिर
करण्याचा सोपा मार्ग.
“कधी कधी आपण स्वता:चं वेगळेपण जपण्याच्या
नादात ..स्वता:चं .. स्वता:पण
हरवून बसतो ..”
“इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱयांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे, या सत्याची खऱया अर्थाने खरी जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी क्रांती होणे शक्य नाही.
‘हृदयातील देव अंतकरणात कसा धरून ठेवायचा’
हे शिकवितात ते सद्गुरू.
‘स्वतचा अहंकार चेपणे व दुसऱयाचा अहंकार जपणे’
ही आहे सुखी व यशस्वी जीवनाची
गुरूकिल्ली.’
‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा।
इतरांनी वहावा भार माथा।।’
‘विश्वातील प्रत्येक माणूस हीच साक्षात् परमेश्वरानेच निर्माण केलेली परमेश्वराची जिवंत मूर्ति आहे’़, या सत्याची जाणीव ठेवून जीवन जगण्यात खरी मूर्तिपूजा व खरा धर्म असून त्यात मानव जातीचे कल्याण तर आहेच, शिवाय मानव जातीच्या सर्व समस्या सहज सोडविण्याचे सामर्थ्य सा त्यातच आहे.
‘विश्वप्रार्थना’ हा सर्व चिंतानाश करणारा चिंतामणी, सर्व कामना फलद्रुप करणारी कामधेनू, सर्व संकल्प सिध्द करणारा कल्पतरू व जीवनाचे सोने करणारा परीस आहे. मात्र त्याला प्रयत्नांची जोड हवी.
Suvichar Status In Marathi/ सुविचार स्टेटस मराठी
Suvichar status in marathi |
‘पैसा कमावणे’ हे जितके महत्त्वाचे आहे त्याहुनही कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे ते ‘माणसे जोडणे’, मग ती माणसे घरातील असोत कीं घराबाहेरची, या सत्याची जाणीव होण्यात खरे शहाणपण आहे.
‘देतो तो देव’ या सिद्धांताप्रमाणे जीवनविद्या सात देवांची उपासना करण्यास शिकविते ते सात देव म्हणजे-माता, पिता, शिक्षक, सद्गुरु, आत्मदेव, राष्ट्र आणि विश्व हे होत.
‘कर्ता करविता देव आहे’अशी बहुसंख्य लोकांची चुकीची कल्पना आहे. जीवनविद्या सांगते, कर्ताही तूच व करविताही तूच आहेस कारण ‘तो आणि तू’ एकच आहेस. म्हणुन “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’’
‘आपण सुखी क्हावे, इतरांचे काय वाटेल ते होवो’ अशी वृत्ती ही प्रकृती, ‘आपले काय वाटेल ते होवो पण दुसऱयांचे वाटोळे झालेच पाहिजे’ अशी वृत्ती ही विकृती, ‘आपण सुखी असावे व इतर सर्व सुखी क्हावेत’ अशी वृत्ती ही संस्कृती होय.
।। यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो…!!
ह्रदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते.
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, त्यात काय ? ’सफरचंद’ म्हणावं.
हेतू, परिणाम आणि स्वरूप ही तिन्ही पाहून
कर्माची योग्यता ठरवावी.
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर…..
पण सुरुवात माझ्यापासुन कर
हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ.
माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ.
हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि
समृध्दी मिळते .
हृदयात अपार सेवा भरली कि सर्व
मित्रच दिसतात.
हृदयविना केलेली ओठांची हालचाल
व्यर्थ आहे.
हिरेतुल्य जीवनास कवडीतुल्य
बनवू नका.
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे,
मग ती एखाद्या माणसाची
असो वा पशुची !
हातातल्या सुखाचा त्याग करून, जो काल्पनिक सुखाच्या मागे धावतो, त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही
हसण्याशिवाय गेलेला दिवस
व्यर्थ समजावा.
हसण्याचं मोल काय आहे हे
रडल्यावरच कळतं.
हळवेपणा बाजूला ठेवा वास्तवाला जाण्याची
तयारी ठेवा.
हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे पण एक दोष
दूर करणे फार कठीण आहे.
हक्कासाठी झगडण्यापेक्षा कतर्व्याशी
प्रामाणिक राहा.
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या
दोन बाजू आहेत.
स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या
विद्यार्थ्याचे ब्रीद.
स्वावलंबी शिक्षण हे आमचे
ब्रीद आहे
स्वार्थरहीत खरीखुरी सेवा हीच
खरी प्रार्थना.
Suvichar Quotes In Marathi/ सुविचार कोटस मराठी
Suvichar quotes in marathi |
स्वाभिमान असावा पण
गर्व नसावा.
स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्गदेवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला ‘जीवन’ असे म्हणतात.
स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा जन्मसिध्द
हक्क आहे.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे
जबाबदारी.
स्वातंत्र्य म्हणजे विष, स्वराज्य
म्हणजे दुध.
स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होते.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे !
स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हांला झोपू देत नाहीत
स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर
उभा असतो.
स्वता:वर प्रभुत्व असल्याशिवाय इतर सर्वांवर प्रभुत्व गाजविणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते.
स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा
विकास खुंटला.
स्वतःची यतार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो.
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच
अनर्थ टळतात.
स्वतःची चिंता न करता जो दुसर्याची चिंता करतो
तोच खरा संन्याशी.
स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत
स्वतःचा अवगुण शोधणं हीच
गुणांची पूर्तता !
स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात
महत्वाची गुंतवणुक
स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
स्वत:च्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड हि रचले आहे.
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
स्वत: स्वाध्यायात प्रवृत्त होऊन, दुसर्यांनाही याकरिता प्रेरित करणे, एक अनमोल सेवा आहे.
स्वच्छता ही ईश्वर भक्तीच्या खालोखाल
महत्त्वाची आहे.
स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.
स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे, व पुरुषांना दुसरा नियन लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.
स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते
तोच खरा शिक्षक !
स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. तुम्ही तुमच्या whatsapp status लाही ठेऊ शकता.तसेच इतर social media accounts वरही share करू शकता.
🙏…धन्यवाद…🙏